Sunday 17 January 2016

रोहीत वेमुला

रोहित वेमुला #Rohit__Vemula हम लडेंगे..!

रोहीतने लिहलेले पत्र जसेच्या तसे....

Good morning,

I would not be around when you read this letter. Don’t get angry on me. I know some of you truly cared for me, loved me and treated me very well. I have no complaints on anyone. It was always with myself I had problems. I feel a growing gap between my soul and my body. And I have become a monster. I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan. At last, this is the only letter I am getting to write.

I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan.

I loved Science, Stars, Nature, but then I loved people without knowing that people have long since divorced from nature. Our feelings are second handed. Our love is constructed. Our beliefs colored. Our originality valid through artificial art. It has become truly difficult to love without getting hurt.

The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind. As a glorious thing made up of star dust. In every field, in studies, in streets, in politics, and in dying and living.

I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense.

My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.

May be I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.

I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.

People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don’t believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds.

If you, who is reading this letter can do anything for me, I have to get 7 months of my fellowship, one lakh and seventy five thousand rupees. Please see to it that my family is paid that. I have to give some 40 thousand to Ramji. He never asked them back. But please pay that to him from that.

Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.

“From shadows to the stars.”

Uma anna, sorry for using your room for this thing.

To ASA family, sorry for disappointing all of you. You loved me very much. I wish all the very best for the future.

For one last time,

Jai Bheem

I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself.
No one has instigated me, whether by their acts or by their words to this act.
This is my decision and I am the only one responsible for this.
Do not trouble my friends and enemies on this after I am gone

रात्रीपासूनची अस्वस्थता अजून डोळ्यात अश्रू आणत आहे....कुठे आहे असुरक्षितता म्हणत देशातील या मनुवादी विचारसरणीचे समर्थन करणे खुप सोपे असते...!

पण समानतेचा झगडा खुप अवघड आहे.....एकलव्याचा अंगठा कापून घेणारे द्रोणाचार्य अजून जिंवंत आहेत...नुसते जीवंत नाहीत आता ते नरभक्षक झाले आहेत...!

आपण निष्प्रभ झालो आहोत त्यामुळे हल्ले वाढत आहेत असे आपलेच मित्र आहेत....रागाच्या भरात बदला घेणेची चर्चा होत असते होत राहील...!

पण आपण जिकंत आहोत याचे भय त्याना अशा निकराच्या चाली खेळायला भाग पाडत आहे...आपला संविधानावरील देशाच्या कायदयावरील विश्वास कमी व्हावा हि त्यांची इच्छा आहेच...!

त्याना हे संविधान नकोच आहे...पण आपला विश्वास अटळ असला पाहिजे...स्वतःवरही आणि संविधनावरही...!

आपले मरण इतके स्वस्त झाले नाही....!

हम लड़ेंगे सिर्फ जितने के लिये ही लड़ेंगे...!

शिवराम ठवरे 18-01-2015

प्रति शिवाजी राजे उमाजी

"श्रमिक जागृती व्याख्यानमाला शिवथर"

व्याख्यान पहिले-"प्रती शिवाजी राजे उमाजी"

आपणा सर्वांचे सहकार्याने वैचारिक जागृतीची सुरुवात म्हणून शिवथर ता.सातारा येथे आपण "श्रमिक जागृती" या नावाने जानेवारी 2016 पासून मासिक व्याख्यानमाला सुरु करणेचा संकल्प केला होता...!

पंचशील मित्र मंडळ,राजे उमाजी नाईक मित्र मंडळ शिवथर यांचे सहकार्याने जनमित्र सामाजिक विकास संस्था सातारा आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र शाखा-सातारा आयोजित "श्रमिकजागृती" व्याख्यानमालेस शिवथर येथे उत्साहात सुरुवात झाली...!

कार्यक्रमाचे सुरवातीला विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके यानी व्याख्यानमालेचे आयोजन करत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले...!

वसंतराव चव्हाण यांची ओळख करुन देत त्यांचे कार्याचा त्यानी अल्पपरिचय करुन दिला...!

वसंतराव चव्हाण यानी आपल्या भाषणात राजे उमाजी आणि बहुजन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांचे जीवनातील समान दाखले देत परस्थिती जर अनुकूल असती तर उमाजीने देशाचे चित्र बदलले असते असे स्पष्ट करीत इंग्रज सत्ते विरोधात प्रथम बंड पुकारनारा उमाजी हा "पहिला भारतीय बंडखोर राजा" आहे असे सांगितले...!

वसंतराव चव्हाण यानी उमाजीचे जीवनातील अनेक प्रसंग सांगत आपला "भटाळलेला इतिहास" बदलावा लागेल आणि बहुजन समाजातील शिक्षित पिढीने आता घोकमपट्टी सोडून समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार स्वीकारत प्रगती साधली पाहिजे असे सांगितले...!

कष्टकरी समाजातील मुले शिक्षण घेताना अनेक कारणे सांगत असतात मात्र तुरुंगात असताना "इंग्रजी शिकणारा उमाजी" समजून घेणे ही काळाची गरज आहे असे सांगत शिक्षण हेच 'बहुजनांचे मुक्तिद्वार" आहे बोलले श्रमिक कष्टकरी माणसाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही...!

स्वातंत्र मिळून 67 वर्षे झाली तरी आजही कष्ट करणारा समाज मागासच राहिला असून सरकार नावाची गोष्ट देशात केवळ कागदावर राहिली आहे असे बोलताना "संविधानातील तरतुदी" माहित करुन त्याचा लाभ घेतला पाहिजे...!

सरकार आपल्या घरी येणार नसून आपणच संघटित होऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजेत याकरीता वेळप्रसंगी आपण "संघर्षशील" भूमिका घ्यावी असे आवाहन केले...!

श्रमिक जागृतीची सुरुवात अखंड सुरु राहावी हिच प्रमाणिक इच्छा कार्यक्रमाचे शेवटी व्यक्त करीत त्याकरीता शकय ती मदत करेन असे आश्वासन दिले...!

कार्यक्रमास बेलमाची,दुधनवाडी तसेच मर्ढ़े येथील  जिजाबा जाधव,अजित जाधव बाळासाहेब जाधव,सूर्यकांत नलगे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....!

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवथर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र बोर्डे होते,सूत्रसंचालन सामजिक कार्यकर्ते नितिराज साबळे यानी तर आभार शिवराम ठवरे यानी माणले...!

कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील,उपसरपंच प्रकाश साबळे,नितिराज साबळे,जगन्नाथ बोर्डे,मनोज गुजले,संतोष कांबळे,विजय कांबळे,राजेश पवार(गुरव),तुषार चव्हाण,गणेश भंडलकर,राहुल बोर्डे, तसेच पंचशिल आणि उमाजी नाईक मंडळाचे कार्यकर्ते यानी खुप सहकार्य केले...!

शिवराम ठवरे 16-01-2016
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

Friday 15 January 2016

असुर बहुजननायक श्रीकृष्ण

"कृष्ण"बहुजन नायक

कृष्ण-बलराम दैव वादाला विरोध करणारे असुर महामानव.....!

असुर का कारण "कंस" असुर होता याचा अर्थ त्याची बहिण देवकीचे पोटी जन्म घेणारी संतती असुरच....!

ज्यानी सर्वप्रथम सुर सम्राट इंद्राचा पराभव केला...गोवर्धन प्रसंग आठवा.

आपल्या राज्यातील गोपालक शेतकरी समाजातील लोकांचा रोजगार असणाऱ्या दुग्ध व्यवसायास चालना देऊन पहिली "धवलक्रांति" केली.

त्यालाच "दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चोर" म्हणून ब्राम्हणी लेखकानी बदनाम केले.

स्त्री जातीला आत्मसन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले जनजागृती केली त्यालाच "16 हजार 108" बायका केल्या "रासलीला" करुन संभोग केला असे म्हणून बदनाम केले.

बहुजन समाजातील जे लोकप्रिय ते आपले म्हणत कृष्ण आणि बलराम याना दैवत बनवत खरा सत्य इतिहास बाजूला सारत "दशअवतार" संकल्पना  तयार करुन बहुजन समाजाला स्वतःचे पोट भरावे यासाठी मूर्ख बनवले.

निसर्गपुजेला प्रमाण मानत कृषी संस्कृतीचा गौरव केला..... नागाला मारु नका तो "शेतकरी मित्र" आहे असे त्यानेच सर्वप्रथम सांगितले....कालिया मर्दन आठवा...!

पारंपरिक खेळ,स्थानिक संस्कृती उत्सव याना प्रोत्साहन देणारा अनोखा बहुजन नायक..खो-खो,कबड्डी,लगोर,सुरपाटया,चेंडूफळी,मल्लयूद्ध इत्यादि...!

उखळ-मूसळ आणि नांगर या बहुजन समाजाचे रोजच्या जगण्यातील प्रतिके राष्ट्रचिन्ह म्हणून वापरणारा बहुजन समाजाचे प्रगतिचे "सुदर्शन चक्र"फिरवणारा महान सम्राट.

कौरव आणि पांडव यांचे राजकीय  युद्धात प्रत्यक्ष अथव अप्रत्यक्ष सहभागी  नसतानाही बहुजन समाजातील लोकप्रियता लक्षात घेऊन  "ब्राह्मणी मनूस्मृती" आणि "वर्णव्यवस्था" गिता नावाच्या ब्राह्मणी पुस्तकातुन त्याचे नावे खपवन्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रामणी वृतीचा निषेध.

आता आपण शिक्षित आहोत.... जागृत आहोत...प्रश्न उपस्थित करू...चर्चा करू ..खरे खोटे समजून घेऊ....बहुजन समाजातील महापुरुष बदनाम करण्याचे ब्राम्हणी षडयंत्र उध्वस्त करू...!

या  वर्षी "कृष्णजन्माष्टमी" च्या आनंदात सहभागी होत फक्त ही चर्चा सर्व बहुजन समाजातील शिक्षित लोकांपर्यंत पोहचवा आणि संस्कृति शुद्धी करण्याचे महान लढाईचे प्रवर्तक  होऊया....!

प्रतिगामी विचार डोक्यातुन काढून माझ्या धडावर माझ्या विचारांचे डोके बसावे म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झटनारया डॉ.आ.ह.साळुंखे,डॉ.बाबुराव गुरव,कॉ.धनाजी गुरव,राजाभाऊ शिरगुप्पे,कॉ.विजय मांडके, प्रा.गौतम काटकर आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी,माझी बायाको सुनंदा  सर्व विद्रोही सहकारी यांचे विचारततून....!

शिवराम ठवरे 05-09-2015
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

फलटण ग्रामीण पोलिस


फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या "दबंग" टीमचा सातारा एस.पी कडून विशेष सत्कार....!

हॉलीवुड चित्रपटात शोभावी अशी भन्नाट कामगिरी केवळ 11 दिवसात केली...सर्व पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव....!

सातारा पोलीस दलातील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन म्हणून दर महिन्याला "पोलीस मॅन ऑफ द मंथ",'पोलीस स्टेशन ऑफ़ द मंथ",बेस्ट ड़ेटीकेशन ऑफ द मंथ आणि बेस्ट कंनविक्शन ऑफ़ द मंथ असे पुरस्कार दिले जातात....!

नोव्हेंबर महिन्यात केवळ 11 दिवसात फलटण तालुका पोलिस स्टेशनचे DYSP चोपड़े आणि PI घोलप यांचे मार्गदर्शनात फलटण DB ब्रांचने 18 गुन्हे मोठ्या शिताफीने उघडकिस आणले आहेत...!

विविध प्रकारच्या 18 गुन्ह्यातील 28 आरोपी अटक असून 25 लाखाचेवर मुद्देमाल जप्त केला आहे....!

गुन्हा करीत असताना वापरलेल्या 2 सुमो गाड्या,11 दुचाकी  आणि 1 JCB मशीन,ब्रेकर मशीन देखील जप्त केली आहे....!

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या कामगिरीची दखल घेत नोव्हेंबर 2015 चा "बेस्ट डेटिकेशन ऑफ द मंथ" हा पुरस्कार सातारा जिल्हा SP अभिनव देशमुख यांचे हस्ते डि.बी.टीमचे पोलीस इंस्पेक्टर घोलप सर,कॉन्स्टेबल नीलेश दयाळ,मनोज जाधव,तानाजी शिंदे,पंकज ढ़ाणे,विक्रांत लावंड आणि गणेश करपे यांना प्रदान करण्यात आला...!

पोलीस दलातील उत्तम कामगीरीचे स्वागत होणे खुप गरजेचे आहे कारण यामुळे तरुण,उत्साही आणि धाड़शी कर्मचारीवर्गाला प्रेरणा मिळते...!

देशांअंतर्गत कायदा सुव्यस्थता आणि शांततेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलातील अशी अभिनव कामगिरी जनतेसमोर येत नाहीत किंवा जाणून बूजुन आणले जात नाहीत हे वास्तव आहे...!

सातारा पोलीस दल आणि फलटण पोलिस दलाचे या कामगिरीमुळे मनापासून अभिनंदन...!

शिवराम ठवरे
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25@gmail.com

कल्लूळाचे पाणी

मुळगाणे

कल्लूळाचे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?||धृ||

साखराबाई आराधीने प्रश्न विचरला मला....
आणि त्या प्रश्नाचे उत्तर सांगतो मी आराधीला....
"आत्मलिंग" म्हणतात त्या हो लिंगाला
आत्मलिंग म्हणतात त्या हो लिंगाला||1||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला....
आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल साखराबाईला.....
अहो माणसाला वाटणी घातली देवानं आपली आपल्याला.....
आणि "आत्म्याची जात" कोणती हे सांगून द्यावे लागेल या प्रजेला...||2||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

आणि साखराबाई बोलली मला.....
माळ कशाला घातली गळयला ....
असा विचार केला नव्हता कधी....?
आई बापानं "आराधी" सोडल मला बाळपणाला.....||3||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

अग प्रश्न पडला माझ्या आई वडलाच्या जिवाला....
अग चैती पोर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला.....
आन तू शाहन्या मनाची म्हणून पाठवल मला तुझ्या संगतीला....||4||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

माझी निंदा करतो येणार जाणारा .....
अग हेला काही नाही आकलिचा इचार....
आग मी तर आराधी भोळया मनाचा....
आणि गळयामधी माझ्या "जरसाज" कवडयाचा.....||5||

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

परीक्षण

🌿🌿कल्लूळा चे पाणी🌿🌿🌺

कल्लूळा चे पाणी कशाला ढवळले..?
नागाच्या पिल्याला का ग खवळले...?

#कल्लूळाचंपाणी हे गाणे सगळीकडे आवड़ीणे वाजवले जात आहे.....! पण हे गाणे म्हणणारे "आराधी" आणि गाण्यात उल्लेख असलेले #कल्लोळतीर्थ कुठे आहे.....?

बहुजन समाजातील आदर्श #तुळजापूर संस्थानची राणी अंबाबाई अर्थात #तुळजभावानी मंदिरातील #कल्लोळ तीर्थ......!

तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारातून थोड़े खाली आल्यानंतर मंदिरात जाताना पायरया उतरत असताना उजव्या बाजूला दगडी बांधकाम असलेले #कल्लोळतीर्थ आहे....!

या कल्लोळात अंघोळ केल्याने आपल्या माणसाला असणाऱ्या त्वचारोगाच्या व्याधी दूर होतात असे समजले जाते....!

सध्या त्वचारोग बरे होतात कि नाही हा भाग चर्चेचा होईल पण कधीतरी इतिहासात या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे नाकारुन चालणार नाही.......!

सदर मंदिर "चुनखड़ीयुक्त" लहान डोंगरावर असून "नैसर्गिक झरे" असल्यामुळे येथे औषधी गुणधर्म चुनखड़ी मिश्रित पाणी लावल्यामुळे त्वचरोग नाहीसे झाले असतील.......!

कालांतराने या ठिकाणी मंदिर झाले त्यामुळे या नैसर्गिक झरयाला देवीच्या चमत्काराचे स्वरूप प्राप्त झाले......!

झरयाचे बांधकाम पहिले असता बहुजन समाजातील #नागसंस्कृतीशी याची नाळ सहज जुळते कारण #कल्लोळतिर्थाचे मध्यभागी नाग मूर्ति ......!

आपल्या गावातील ग्रामदैवत किंवा मुख्य चौकचे ठिकाणी दगडी नागमूर्ती देखील आपले नाग संस्कृतीशी नाते जोडणारेच आहेत....!

महाराष्ट्रातील बऱ्याच बहुजन हिंदू कुटुंबात याच अंबाबाईला #कुळदेवता का मानली जाते याचाही आपण विचार केलाच पाहिजे....!

ब्राह्मणी संस्कृती पासून आपले सरक्षण व्हावे आणि आपली बहुजन हिंदू संस्कृती टिकून रहावी यासाठी लोककलावंताचा मोठा समाज घटक जनजागृती करीत होता....करीत आहे.......!

गोंधळी,वाघ्य,मुरळी,भोपे,आराधी, नंदिवाले,वासुदेव,पिंगळा याचप्रमाणे देवीची स्तुती सांगणारे "आराधी'...!

हे आराधी आपली बहुजन हिंदू महापुरुष,महा माता म्हणजेच कुळ पुरुष आणि कुळदेवता यांचा इतिहास जपावा यासाठी मौखिक स्वरुपात कला सादर करुन प्रयत्न करीत असत....!

लिखानकला अवगत नसल्यामुळे मोडतोड करीत आता ते काहीतरी चमत्कार  सांगत आहेत पण एकूणच त्यांचा सूर "कुळदेवीला विसरु नको" असाच असतो....!

आपल्या या महान बहुजन संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहेच पण हे सारे संदर्भ गोळा करुन इतिहासाची पुन्हा मांडणी करावी लागेल....!

त्यामुळे गाण्याचा आनंद घेण्या सोबतच यात "आत्मलिंगाला ओळखा" आणि "आत्मलिंगाला कोणतीही जात,धर्म आणि पंथ असत नाही" हा  साखराबाईला उद्देशुन दिलेला समतेचा संदेश शांतपणे गाणे ऐकले तर तुमच्याही सहज लक्षात येईल....!

यातूनच आपली बहुजन हिंदू संस्कृती किति समृद्ध आहे आणि हा आराधी किती मौलिक विचार सांगून जातो ते समजेल....!

आपणही हे कधी तुळजापूरला गेला तर अवश्य लक्षात ठेवा,चर्चा करा सत्य समोर अणन्याचा प्रयत्न करुयात,काही चुकीचे किंवा  वेगळे वाटत असेल तर अवश्य संपर्क करा....!

शिवराम ठवरे 27-09-2015
मुक्त पत्रकार 9185273528
shivramthavare25@gmail.com

संग्राम प्रकल्प कामगार पिळवणुक

ई-पंचायत/संग्राम प्रकल्पाअंतर्गत काम करणारे महाराष्ट्रातील सुमारे  26000 संगणक परिचालक "महाऑनलाइन आणि महाराष्ट्र सरकार" यांचे वेठ बिगार नाहीत....!

आजच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना राज्यभरातील संगणक परिचालकांनी आज (बुधवार) सकाळी विधानभवनावर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला अशा बातम्या येत आहेत...!

महाराष्ट्रात 2011 पासून कंत्राटी काम करणाऱ्या संगणक परीचालकांच्या प्रश्नाचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न मागील 4 महीने पत्रकार म्हणून सुरु होता....!

पंचायतराज संस्थाचे बळकटीकरण करुन त्यात "पारदर्शकता व सुसुत्रता" आणणे करीता केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने ई-पंचायत हा Mission Mode Project सर्व राज्यात राबवण्याचा निर्णय 2011मधे  घेतला...!

महाराष्ट्रात ग्रामविकाMस विभागामार्फत या ई-पंचायत प्रकप्लाची अमलबजावणी "संग्राम" अर्थात "संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र" या नावाने सुरु केली...!

सदर प्रकल्प उत्तमपणे राबवणेकरीता "महाऑनलाइन" या शासननियुक्त कंपनीस हस्तांतरित करण्यात आला...महाऑनलाइन हि महाराष्ट्र शासन आणि "बडे भांडवलदार टाटा" यांचे "टाटा कन्सलटन्सी सर्विसेस" यांची भागीदार कंपनी आहे...!

सदर प्रकल्प उदिष्टपूर्ती करीता महाराष्ट्रातील प्रत्येक पंचायतराज संस्थामधे(जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत) संग्राम केंद्र स्थापन करण्यात आली....!

संग्राम केंद्रे सुरु करुन शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्याचा उद्देश् ठेवला...सर्व दाखले,उतारे एका क्लिकवर सगंणकिय पद्धतीने लोकाना "जादा मोबदला" देऊन मिळू लागल्या...!

मुख्य गोम म्हणजे संगणक परिचालक काम करतात जनतेसाठी....आणि रिपोर्टिंग करतात ग्रामसेवक या शासकीय प्रतीनिधिस... पण कामगार विरोधी शासकीय धोरणामुळे "टाटा" या भांडवलदाराचे घर भरत शासकीय आणि खाजगी अधिकारी यांचे मदतीने मलिदा खाता यावा याकरीता महाराष्ट्र शासनाने सर्व 26000 कर्मचारी महाऑनलाइनच्या दावणीला 'वेठबिगार" म्हणून बांधले...!

2011 पासून 3500 ते 4500 प्रतिमाह सर्व संगणक परिचालक प्रमाणिकपणे काम करीत आहेत...सर्व पंचायतीचे रेकॉर्डचे संगणकीकरण करणे...रेकॉर्ड अदययावत करणे...आणि नेमून दिलेले काम करणे हि जबाबदारी लोकसेवक म्हणून पार पाडत आहेत....!

वेतन कमी आहेच पण कोणतीही रजा नाही...वैदयकीय सुविधा नाहीत...पगार नियमित नाही...कामाचे तास नियमित नाहीत...इतकेच काय महिला कर्मचारी प्रेग्नेंट राहिली तर रिजाइन केल्याशिवाय पर्याय नाही.....!

या सर्व बाबी लक्षात घेता सर्व  महाराष्ट्र संगणक परिचालक एकत्र येत राज्यव्यापी संघटना स्थापन करुन नियमित पगार...आणि शासकिय नोकरदार म्हणून सलग्नता मिळावी म्हणून मोर्चे,आंदोलने चालू आहेत...!

संगणक परिचालक "वेठबिगार" नसून लोकसेवक आहेत हे मान्य करून त्याच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे....!

"अच्छे दिन" आणि "डिजिटल इंडिया" ची स्वप्ने दाखवनारे सरकार जर आज याकड़े दुर्लक्ष करुन लाठीमार करीत असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे...!

सर्वसामान्य माणसाला वस्तु स्थिति सामजावी म्हणून हि बातमी सोशल मीडियावर पाठवत आहे...आज त्या 26000 कुटुंबातील तरुण न्याय हकक मिळावा म्हणून मार खात उदया कदाचित आपण असू शकतो...!

सर्वच क्षेत्रातील कंत्राटी कामगार नियमित व्हावेत याकरता जनमत तयार करा...बातमी आहे तशी शेयर करा...सहभागी व्हा "कामगार विरोधी भांडवलशाही" गाडून टाकण्यासाठी एक कृतिशिल पाऊल टाकुयात...चला एक होऊयात...!

अधिक आणि अचूक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर "संग्राम संबंधित शासननिर्णय" अवश्य वाचा...!

शिवराम ठवरे 16-12-2015
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25@gmail.com

धनगर ST आरक्षण आणि आदिवासी समाज

धनगर ST आरक्षण आणि आदिवासी समाज

सर्वच राजकीय पक्ष "धनगर ST आरक्षण" या बिन महत्वाचे प्रश्नाचे भांडवल करीत आहेत (मधेच ज्याप्रमाणे मातंग समाजाला स्वतंत्र SC आरक्षण पाहिजे अशी मागणी होत होती ) वास्तवात धनगर समाजाला "राज्यात NT आणि देशात OBC आरक्षण" आहे त्याचे सर्व लाभ मिळत आहेत...आणि धनगर समाज ते घेत आहे....स्थानिक स्वराज्य संस्था मधील OBC आरक्षण घेऊन राजकीय लाभ देखील घेत आहे....!

त्यामुळे धनगर आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत नसून त्याना NT/OBC आरक्षण सोडून "ST आरक्षण" पाहिजे आहे...?

खरे तर वास्तवात फक्त डोंगरदरयात राहणारा "गवळी धनगर" समाज ST चे निकष पूर्ण करु शकतो ज्याची लोकसंख्या "30 हजार" चे आसपास असेल पण त्याचे आडून सर्वच धनगर ST चे राजकीय लाभ (फक्त आमदारकी आणि खासदारकी) मिळावेत यासाठी दिशाभूल करीत आहेत...!

ज्यावेळी प्रथम सर्वे झाला तेव्हा सैम्पल सर्वे म्हणून बहुतेक गवळी समाजातील डाटा गोळा केला त्यामुळे घोळ झाला ज्याप्रमाणे मराठा आरक्षणसाठी कुणबी लोकांचे सर्वे झाले आताही ते असेच करण्याची शक्यता आहे त्यामुळेच कुणबी OBC झाले आहेत पण मराठा आरक्षण कोर्टात टिकत नाही आणि पुन्हा दिले तरी टिकणार नाही....!

धनगड आणि धनगर हा घटनेत काहीच घोळ नाही घटनेत "धांगड" अशी आदिम जमात आहे त्याचे इंग्रजी Dhangad असेच होते काही "अतीशहाणे धनगर विचारवंत" त्याला D नाही R आहे बोलू लागले आणि अजून जास्त गोंधळ झाला....!

मुळात सध्या धनगर समाज देखील गोंधळात आहे कि नवीन सर्वे करुन धनगर ST मधे जावेत कि D चा R करुन जावे......दोनीही शकय नाही हे वास्तव कोणताच राजकीय पक्ष स्पष्टपणे सांगत नाही आणि सांगणार नाही....!

याच बरोबर "आदिवासी समाजातील नेते" देखील तुमचे आता आरक्षण धनगर समाज नेणार अशी "खोटी हुल" देत आहे आणि आदिवासी देखील मूळ मुद्दा लक्षात न घेता धनगर समाजाचे विरोधात आंदोलन करतात.त्यामुळे धनगर आणि आदिवासी "शत्रु" असल्या सारखे वागत आहेत...आणि नुकताच शिक्षण घेऊन जागा होत असलेला बहुजन समाज विभक्त होत चालला आहे...!

"धनगर ST आरक्षण" या मुद्यावर "आदिवासी आणि धनगर" दोन्ही घटक "पाहिजे तसे नाचवता" येतात याची जाणीव सर्वच राजकीय पक्षाना झली आहे म्हणून तो प्रश्न कायम असाच राहणार आहे...त्यामुळे वास्तव काय आहे हे कोणीच सांगत नाही...!

यासाठी दोन्ही समाजातील बेरोजगार अल्पशिक्षित तरुण त्याना भांडवल म्हणून फुकट मिळत आहे....!

त्यामुळे सध्या दोन्ही समाजाला आरक्षणामुळे मिळत असणारे "मोफत शिक्षण,शिष्यवृत्ती,वसतिगृह,स्वयंरोजगार अनुदान गृहबांधणी अनुदान इत्यादी असंख्य लाभ योग्य प्रकार मिळत नाहीत....शासकीय नोकरीत अनुशेष अजून भरला जात नाही....शासकीय "नोकरया प्रोजेक्ट वर्क आणि विविध संस्था" तयार करुन "कंत्राटी" केल्या जात आहेत...यासारखे मूळ प्रश्न बाजूला राहत आहेत आणि केवळ आपण टक्कर मोर्चे काढून एकमेकांची डोकी फोडून घेत आहोत...!

समाजातील जागृत घटकाने याबाबत जागृती करुन "आदिवासी आणि धनगर" या दोन्ही समाजातील लोकाना वास्तव सांगणे हिच आता खरी गरज आहे....!

शिवराम ठवरे 11-12-2015
मुक्त पत्रकार-9175273528
shivramthavare25@gmail.com

अग्नीसंस्कारा शिवाय झालेला विवाह अवैदिकच

अग्निसंस्कारा शिवाय झालेला विवाह अवैदिकच......!

कालच झालेल्या माझा मित्र सूर्यकांतच्या झालेल्या लग्नाचे बारकाइने निरीक्षण केल्यानंतर अशा प्रकारे होणारा विवाह हा संस्कार वैदिक नसुन आपली महान "बहुजन (बळी) परंपरा जपणारा एक संस्कृती उत्सव (cultural event)" असल्याचे स्पष्ट दिसुन येते…………..! त्याचबरोबर ही संस्कृती परत यावी म्हणून वेद प्रामाण्य नाकारून, ब्राह्मण पुरोहीत सामाजाचे शिवाय बहुजन समाजातील मुलांची लग्न व्हावी यासाठी सत्यशोधक समाजाचे माध्यमातून युगप्रवर्तक प्रबोधन आणि कृती कार्यक्रम करणाऱ्या आपले आदर्श महात्मा फुले यांचे सत्यशोधक विवाहचाच हा भेसळ झालेला अविष्कार आहे असे माझे ठाम मत आहे......! त्यामुळे आता होणारी बहुसंख्य लग्न अग्निसंस्कार हा विधीच न करता होत आहेत हे महाराष्ट्रात काही वर्षापुर्वी जोर असणाऱ्या सत्यशोधक चळवळीचे यश असून हे सुप्त सांस्कृतिक परिवर्तनच आहे......!

माझ्या या मताला आधार म्हणून खालील विवेचन देणे गरजेचे आहे आपणास हे वाचताना कोणत्याही वेळी,कोणत्याही प्रकारची शंका आल्यास आपण यात बदल करण्यास कधीही प्रयत्न करुयात.

वैदिक हिंदू धर्मातील विवाहसंस्कार......!

"वैदिक हिंदू धर्मात" विवाहाचे वेळी "अग्निसंस्कार प्रमाण" मानून वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्र म्हणत पुरोहिताचे उपस्थितीत अग्निकुंड अर्थात होमाचे बाजूने सप्तपदी चालणे असा लग्न संस्कार सांगितला आहे......!  आपणाकडे पूर्वी ही पद्धती नव्हती पण T.V. मालिकांचा प्रभाव आणि पुरोहितांचे पोट भरण्याचे साधन म्हणून अलीकडे काही ठिकाणी हा आढळतो……….! त्याच बरोबर यासाठी ब्राह्मण पुरोहित असणे धर्माने बंधन कारक केले आहे.........! ब्राम्हण पुरोहिताशिवाय केलेला विवाह धर्माने मान्य नाही याच्या संदर्भात इग्रज लोकांकड़े पुरंदरच्या कोर्टात सत्यशोधक समाजाचे विरोधात केलेला खटला प्रसिद्ध आहे.......! यावरून विवाह आणि ब्राह्मण याचा संबंध सहज लक्षात येईल.
ब्राम्हणास त्याने लग्न केल्या बद्दल दक्षिणा देणेही बंधन कारक आहे त्यामुळे कदाचित यांच्या घशात  जाणाऱ्या दक्षिणे करीताच मुलीच्या पालकाकडून हुंडा घेण्याची अनिष्ट प्रथा तर सुरु झाली नसेल ना.....? याचेही संशोधन होणे गरजेचे आहे.....!

बहुजन हिंदु धर्म विवाह परंपरा………..!

याच्या तुलनेत ग्रामीण भागात होणाऱ्या आपल्या बहुजन हिंदू समाजातील बहुतांश विवाहाचे स्वरूप पहिले असता वर आणि वधु यांचे एकमेकांची पसंती झाल्यानंतर सुपारी आणि साखरपान करून दोन्ही बाजूच्या 5-5 जेष्ठ मंडळीचे समोर विवाहाची निश्चिति केली जाते आणि विवाह नक्की करुन दोन्ही घरी तयारीला सुरुवात होते.

कुळ स्पष्ट करणारे देवक……………..!

याबाबत थोड़ा जरी विचार केला तरी आपली कृषीप्रधान नागरी संस्कृती आणि निसर्गपुजा याचे नाते सांगणारी "मूळ आदिम टोळी संस्कृती" स्पष्ट होईल आपले कुळ स्पष्ट करणारे चिन्ह (Totam) म्हणून एखादे विशेष झाडाची फांदी शुभ चिन्ह समजून दारात उभी केली जाते अलीकडे त्याला "मुहूर्तमेढ़" म्हटले जाते.....!

कुळदेव अथवा कुळ देवीचे टाक……………!

बळी राज्यातील महान परंपरा असणारे आणि ज्या नावांची विभागणी केली असता "बा अर्थात बाप किंवा  आई" अशी उकल होते ते कोणतेही देव आपल्या बळी संस्कृतीचेच वाहक आहेत उदारहण दयायचे झाल्यास जोतीबा,खंडोबा,बिरोबा,धुळोबा,नरसोबा,वाडोबा, इत्यादी पुरुषदर्शक तर मरगुबाई, बानुबाई,ताई बाई,अंबाबाई,सटवाई,काळूबाई,जानाई,मळाई,जोगुबई इत्यादी यासारखीच नाम सदृश्य असणारे टाक(देवाचे मुखवटे) बनवले जातात....माझा प्रश्न सरळ असून हिंदु म्हणून मोठ्या गजावाजा झालेल्या होत असलेल्या राम-कृष्ण-विष्णू-ब्रम्हा किंवा देवांचा राजा म्हणत असलेल्या इंद्राचे अथवा सरस्वती या देवांचे नावाचे मुखवटे अर्थात टाक तयार केल्याचे पहिले नाही किंवा एकलेही नाही.

चौक भरणी…………!

सत्यशोधक चळवळीचे उगम स्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावामधे होणाऱ्या लग्नात महामानव जोतीबा फुले यानी सत्यशोधक विवाह विधि साठी स्वतः लिहिलेल्या मंगल अष्टकाचा वापर ह त्याचा पुरावाच आहे........!

आभारा बहु मानीजे आपुलिया
माता पित्यांचे सदा.....!
मित्रांचे तुमच्या तसेच असती
जे इष्ट त्यांचे वदा.......!
वृद्धा पंगु सहाय्य द्या मुलीमुला
विद्या तया शिकवा......!
हर्षे वृष्टि करा फुलांची अवघे 
टाळी आता वाजवा.....!

शुभ मंगल सावधन.......!
शुभ मंगल सावधन.......!
शुभ मंगल सावधन.......!

(महात्मा जोतीबा फुले समग्र वांग:मय
प्रकरण-सत्यशोधक समजोक्त विवाहसंबंधी विधी
पान क्रमांक -417)

कोणताही माणूस किंवा समाज एकदम बदलणे शक्य नाहीच पण समाजात काही प्रमाणत होत असणाऱ्या सांस्कृतिक बदलाची ही प्रक्रिया समजून घेत बहुसंख्य लोकाना समजेल अशा भाषेत समोर आणून त्याला सकारात्मक वळण देण्याचे काम आपण करीत आहोत त्यामुळेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवर्तनाची प्रमुख विचारधारा आहे.

सांस्कृतिक परिवर्तन दीर्घकाळ आणि अखंड (long term & continues) चालणारी मानवीय बदलाची प्रक्रिया आहे त्यामुळे आपण काही कारणाने पूर्ण वैदिक व्यवस्था नाकरु न शकलेल्या आपल्या या बहुजन मित्रांना त्यानी कळत-नकळत केलेल्या या महान सांस्कृतिक बदलासाठी आभार व्यक्त करुन त्यामुळे समाजात होत असणारे झालेले असे छोटे मोठे सांस्कृतिक बदल समाजापुढे ठळकपणे आणने हे महत्वाचे आहे.....!वैदिक हिंदु धर्म आणि बहुजन हिंदु धर्म यातील फरक सातत्याने स्पष्ट करून सांगणे हेच महत्वाचे आहे.