Saturday 5 March 2016

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....?

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....?

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🍂पहिले चर्चासत्र 23 ऑगस्ट 2015🍂

पहिल्या चर्चासत्रात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आणि हे चर्चासत्र होण्यासाठी पाठिंबा सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रथम हार्दिक अभिनंदन.....!

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🌺🌿🌿🌿पार्श्वभूमी🌿🌿🌿🌺

MSW ची पदवी घेतल्यापासून मागील 3 वर्षे पाहतोय,ऐकतोय आणि   अनुभव घेत आहे....समाजकार्य विषयात 2 ते 5 वर्षे शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे दिव्यच आहे आणि मिळाली तर दरमहा 4 हजार पासून सुरुवात म्हणजे चेष्टाच....?

शिकत असताना तर अडचणी आहेतच पण शिक्षण झालेवर त्यापेक्षा कैक पटीने वाढतात हे लक्षात आले.

सर्वांचा अनुभव सार्वत्रिक आहे हा प्रश्न कुणा एकाचा नाही त्यामुळे आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो का....?

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW शिक्षण घेतलेल्या आणि शिकत असणाऱ्या पदवीधारकांचे प्रश्न शासनासमोर उपस्थित करुन सोडवता यावेत यासाठी आपण संघटित झाले पाहिजे या उद्देशाने ही पहिली बैठक बोलवली.

🌺🌿🌿🌿 सारांश 🌿🌿🌿🌺

अगदी थोड्या वेळातील नेटक्या नियोजनतून झालेल्या या चर्चेतून MSW आणि BSW पदवीधारकांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव आज झालेल्या या चर्चासत्रातुन झाली.

कोणतेही विशेष निमंत्रण नसताना या कार्यक्रमास समाजकार्याचे 51 पदवीधर आणि 2 शिक्षक उपस्थित होते.

यातही विशेष म्हणजे सातारा येथे बैठक असूनही बाहेरील 5 महाविद्यालयातील पदवीधर उपस्थित होते.

सकाळी साडेनऊला सुरु झालेल्या चर्चासत्राची सुरुवात जमलेल्या सर्वांची एकमेकांना ओळख करुन सुरु झाली.

MSW आणि BSW पदवीधर झाल्यानंतर शासन आणि NGO यांचेकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाचे  प्रकार भयानकच होते.

एका राज्य पातळीवर नावाजलेल्या संस्थेने गेली 5 महीने पगारच केला नाही.

शासनाने करार तत्वावर नेमलेल्या MSW शिक्षित कर्मचारयास पगार तर  वेळेवर मिळत नाहीतच पण इतके शिक्षण घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचारया इतकीही किम्मत मिळत नाही.

प्रचलित कामगार कायद्यात |सोशल वर्कर" वा "सेवादूत" असे कोणतेही शब्द। नाहीत त्यामुळे साहजिकच सारया NGO ना कर्मचारी वर्गाचे शोषण करायला मोकळे रान आहे.

कामगार कायद्यात "व्यावसायिक समाज कार्यकर्ता" कोणास म्हटले पाहिजे हेच स्पष्ट केले नसल्यामुळे PF,Gratuity, Minimum Wages,ESIC,Maternity बोनस अथवा पगारी रजा असे कोणतेही लाभ मिळत नाहीत.

🌹🌿🌿पुढील वाटचाल🌿🌿🌹

MSW आणि BSW व्यावसायिक समाजकार्य पदवीधरांची "राज्यव्यापी संघटना" तयार करणे.

संघटना उभारणी करीता आणि जनजागृति करीता शक्य त्या ठिकाणी असे चर्चासत्र आयोजित करणे.

मास्वे "MASWE" च्या पदाधीकारयासोबत चर्चा करुन संघटना सलग्न करणेबाबत चर्चा करणे.

संघटने मार्फत पदवीधरांचे प्रश्न समोर यावेत यासाठी लवकरच एका मसिकाची सुरुवात करणे.

तात्कालिक प्रश्न सुटावेत यासाठी कुणी मदत मागितली तर सहकार्य करणे.

रोजग़ार विषयक मार्गदर्शन करणे.

व्यावसायिक समाजकार्य करणाऱ्या कामगारांचे शोषण थाबवाण्याकरीता स्वतंत्र कामगार कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करणे.

🌺🌿🌿विशेष आभार🌿🌿🌺

चर्चासत्रात सहभागी झालेले सर्व आजी-पदवीधर.

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्धि देणारे सर्व माहित असणारे आणि नसणारे सहकारी.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा चे सर्व प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी.

बैठकीसाठी मोफत हॉल उपलब्ध करुन देणारे कला व वाणिज्य महाविद्यालय साताराचे प्रा.रविन्द्र चव्हाण.

🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺

आगामी कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी आपले मित्र विक्रांत मोरे यांचेशी संपर्क 7350326456 या नंबरवर करु शकता.

आपणास यात सहभागी व्हावे वाटत असेल तर शक्य त्या मार्गाने शक्य त्या ठिकाणी सहभागी व्हा...! मदत करा....!चर्चा करा...! शेअर करा...!

शिवराम ठवरे-26-08-2015
shivramthavare@gmail.com
09175273528

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....!

व्यावसायिक समाजकार्य MSW आणि BSW पदवीधरांचे वास्तव.....!

🍂दूसरे चर्चासत्र 29 ऑक्टोबर 2015🍂
"महात्मा जोतिबा फुले सभागृह"
महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठान कार्यालय,
भवानी पेठ,पुणे.

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

सातारा येथे 23 ऑगस्ट 2015 ला झालेल्या पहिल्या चर्चासत्रात ठरल्याप्रमाणे आज पुणे येथे दूसरे चर्चासत्र घेतले होते यामधे प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आणि हे चर्चासत्र होण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या,सूचना करणाऱ्या,विषय सुचवणारया सर्वांचे प्रथम हार्दिक अभिनंदन.....!

🌹🌹🌹👏👏👏👏👏🌹🌹🌹

🌺🌿🌿🌿 पार्श्वभूमी🌿🌿🌿🌺

सातारा येथे झालेली पहिली बैठक आणि त्यातून MSW आणि BSW पदवीधारकांचे प्रश्न किती गंभीर आहेत त्यामुळे राज्यव्यापी संघटन करणे गरजेचे आहे असे ठरले होते....!

सदर बैठक झालेनंतर बऱ्याच लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नगर येथे बैठक घ्यावी असे ठरवले पण ती काही कारणाने रद्द झाली....!

दरम्यान माझी सोशल मिडीयावर गेलेली पोस्ट वाचून मुंबईचे उदय पारकर,छात्र भारतीचे संदीप आखाडे,APSW चे रमाकांत पडवळ,मयूर बागुल,अनिल पाटील यांचेसोबत संपर्क वाढला....!

त्यातच सातारा येथे आमचे सर प्रा.विजय माने जेष्ठ सहकारी  ऋषिकेश शिलवंत,सुधीर तुपे मधुकर माने आणि माझे सर्व मित्र यांचेसोबत झालेल्या संवादातुन विविध प्रश्न चर्चेत आले आणि "मासिक" सुरु करणेसाठी नियोजन सुरु झाले....!

यानंतर पुणे येथे बैठक बोलवावी असे नक्की केले आणि APSW प्रमुख लोकांशी 23 तारखेला सारसबाग पुणे येथे चर्चा केली आणि एकत्र बैठक घेण्याचे ठरले....!

🌺🌿🌿🌿 सारांश 🌿🌿🌿🌺

नेहमी प्रमाणे कोणतेही विशेष निमंत्रण नसताना आणि सुट्टीचा दिवस नसुनही या बैठकीस  समाजकार्याचे 22 पदवीधर आणि 2 इतरजण असे एकूण 24 जण  उपस्थित होते.....!

पहिल्या बैठकीला उपस्थित असणारे फक्त 3 जण होते इतर 21 जण नवीन होते हे विशेष....!

बरोबर 5 वाजता 7 जण असताना बैठक सुरु झाली आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस नितिन पवार यांचेसह सर्व 24 जणांचे एकमेकांचे परीचयाने बरोबर 8 वाजता बंद केली...!

बैठक झालेनंतरही काही फोन आले आणि प्रतिष्ठान कार्यालयास भेट दिली पण वेळेत न आलेमुळे त्याना सहभागी होता आले नाही....!

बैठकीत अगोदर ठरलेले अजेंडयावरील विषय,आमचे जेष्ठ सहकारी हेमेंत भोसले यानी केलेल्या सूचना आणि उपस्थित सर्व लोकांचे मत विचारात घेऊन चर्चा करुन खालील निर्णय घेतले....!

व्यावसाईक समाजकार्य पदवीधरांची (M.S.W-B.S.W.) एकत्रीतपणे राज्यव्यापी संघटना तयार करायची आहे याबाबत जनमत तयार व्हावे यासाठी राज्यात किमान 10 ठिकाणी अशीच चर्चासत्र आयोजित करणे....!

आपले प्रश्न आणि समाजकार्य बाबत घडामोडी याकरीता सातारा येथून  मासिकाचे प्रकाशन करणे याकरीता "मधुकर माने" यांचेकडे संपादक म्हणून जबाबदारी द्यावी असे ठरले आहे...!

पुणे येथील पर्वती स्वयंरोजगार संस्था येथे नियुक्ति प्रमाणपत्र न देता कमी पगारात M.S.W. पदवीधारकांची पिळवनणूक  केली जात आहे....त्याच बरोबर सातारा येथे TCI फाउंडेशनच्या गेली 6 महीने पासून थकित पगाराबाबत मदत मागितली आहे याचा विचार करुन निवेदन तयार करुन पुढे जावे लागेल असा विचार केला आहे....!

सुधीर तुपे यांचे मार्गदर्शनात सातारा जिल्हा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या अंदोलनास पाठिंबा जाहीर करुन वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या मनमानी पद्धतीने बि.व्हि.जि. इंडिया कंपनीला दिलेल्या ठेक्याचा निषेध केला...!

हेमंत भोसले यानी उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन असे ठरवले संघटना पदाधिकारी निवड होणारच आहे पण अजुन ती वेळ आली नाही....!

MASWE च्या अजेंडयावर समाजकार्य पदवीधरांकरीता महाराष्ट्र कौन्सिल ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्सची स्थापना करणे हा विषय आहे त्याबाबत मसूदा तयार करुन त्यानी शासनास सादर केला आहे त्याचा पत्रव्यवहार वाचून दाखवन्यात आला....!सदर मसूदा मिळवून अभ्यास करणेचे ठरले आहे....!

अहमदनगर येथील नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर सोबत आपले विषय घेऊन बैठक करणे...!

MASWE सोबत काम करणेसाठी संघटना नाव आणि पदाधिकारी निवड झालेवर संलग्नता मागणीबाबत आपलेकडून लेखी अर्ज करावा लागेल असे ठरले...!

प्रोफेशन म्हणून मान्यता मिळावी हा प्रमुख उद्देश् असला तरी NGO सेक्टर आणि सरकारी प्रोजेक्टवर काम करीत असताना समाजकार्य पदवीधारक कामगार म्हणूनच असतो त्यामुळे त्याचे कामाचे नियमन होणेकरीता आपणास काम करावेच लागेल.....!

आगामी बैठकीकरीता महाड,बुलढाणा,सोलापूर,नाशिक,अहमदनगर इत्यादी प्रस्ताव आले आहेत यापैकी सोईची असणारी पुढील बैठक नियोजित करावी लागेल....!

   🌺🌿🌿विशेष आभार🌿🌿🌺

चर्चासत्रात सहभागी झालेले युवराज शिंगटे,विक्रांत मोरे,उत्तम शेळके,सचिन कुंभार सर्व सातारा,नागपुरहून आलेले प्रवीण दिहांदडे,पुणे येथील महिपाल कांबळे,संयोगिता बिराजदार,मानसी भोसले,मयूर बागुल,रमाकांत पडवळ,जास्मिन मढाले,रूपाली जमादार,जनू पागी,शशिकांत जाधव,संदीप भालेराव यांचे प्रतिनिधी,सोलापूरचे अमित अजनालकर,नंदुरबार वरून आलेला राज वळवी, शेगावचा संदीप वानखेडे, संतोष धोको संगमनेर आणि नंतर उशिरा आलेमुळे भेट न झालेले सर्व आजी-माजी पदवीधर....!

संघटना उभी राहवी असे वाटनारे आणि त्याकरिता आपल्या पद्धतीने मदत करणारे सर्वजण...!

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या या नव्या प्रयत्नास प्रसिद्धि देणारे सर्व माहित असणारे आणि नसणारे सहकारी.....!

बैठकीसाठी मोफत कार्यालय  उपलब्ध करुन देणारे महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठानचे साथी नितिन पवार.....
!

🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺

आगामी कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी आपले मित्र निमंत्रक विक्रांत मोरे - 7350326456 आणि मयूर बागूल - 9096210669 यांचेशी संपर्क  करु शकता......!

आपणास यात सहभागी व्हावे वाटत असेल तर शक्य त्या मार्गाने शक्य त्या ठिकाणी सहभागी व्हा...! मदत करा....!चर्चा करा...! शेअर करा...!

शिवराम ठवरे-29-10-2015
मुक्त पत्रकार 9175273528
shivramthavare25@gmail.com
09175273528.

कन्हैय्या कुमारचे भाषण

मी एका गावातून आलेला सामान्य विद्यार्थी आहे. तिथे अनेकदा जादूचे खेळ होतात. हे जादूगार लोकांना अंगठ्या विकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल, असे सांगतात... असेच काही लोक आपल्या देशातही आहेत. ते आम्ही काळा पैसा परत आणू, सबका साथ सबका विकास, अशा बतावण्या मारतात. आपण भारतीय लोक अशा बतावण्या विसरूनही जातो. पण यावेळचा हा तमाशा मोठा आहे आणि तो विसरण्यासारखा नाही,' अशा शब्दांत जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने तुरुंगाततून सुटल्यानंतर मोदी सरकारवर खरमरीत टीका केली. कन्हैयाने आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात आरएसएस, भाजप, अभाविप यांच्यावरही निशाणा साधला.

कन्हैय्या कुमारला हंगामी जामीन मंजूर झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अपेक्षेप्रमाणे त्याची तिहार तुरुंगातून सुटका झाली. विद्यापीठामध्ये देशविरोधी घोषणा दिल्यानंतर त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. कन्हैय्याला खासगी वाहनातून हरीनगर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्याचे जेएनयूमध्ये आगमन होताच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्याने उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.

'आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको. आम्हाला भारतामध्ये स्वातंत्र्याचे वातावरण हवे आहे,' असे कन्हैय्या म्हणाला. भूक, भ्रष्टाचार, भेदभाव आणि मागासलेपणापासून ही मुक्ती.... अशा घोषणा देतच त्याने भाषणाची सुरुवात केली. कन्हैय्याने केलेल्या भाषणाला राजकीय किनारही होती. आपल्या भाषणामध्ये त्याने सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या विद्यापीठामधील कारवाईबाबत तो म्हणाला, ''जेएनयू'वरील सरकारची कारवाई नियोजित होती. त्यांना विरोधाला बेकायदा ठरवायचे होते. रोहित वेमुलाला न्याय मिळावा, यासाठी चाललेल्या लढाईतील धार त्यांना कमी करायची होती. ही लढाई यापुढेही सुरू राहील. लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्यामुळे अभाविप या संघटनेविरोधात कटुतेची भावना नाही.'

हिटलरचीही गोष्ट सांगा...

पंतप्रधान मोदी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणात स्टॅलिनची गोष्ट सांगितली होती. तो धागा पकडून कन्हैया म्हणाला, 'पंतप्रधान जेव्हा स्टलिनची गोष्ट सांगत होते तेव्हा वाटलं टीव्हीत शिरावं आणि मोदींचा सूट पकडून सांगाव... जरा हिटलरविषयीही बोला. हिटलर नाही तर मुसोलिनीबाबत तरी बोला. ज्या मुसोलिनीला आपले गोळवलकर गुरुजी भेटले होते. ज्याच्यासारखी काळी टोपी आपण घालता. त्याविषयी बोला.'

काय म्हणाला कन्हैया?

पंतप्रधान मोदी 'सत्यमेव जयते' असं ट्विट करतात पण 'सत्यमेव जयते' हे कोणा एका व्यक्तीचे होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचं ते देणं आहे. त्यामुळे आम्हीही 'सत्यमेव जयते' म्हणणार आहोत.

माझी स्वत:ची एक विचारसरणी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबध नाही. मात्र माझं समर्थन करणाऱ्या राहुल गांधी, सीताराम येचुरी, अरविंद केजरीवाल या नेत्यांवरही देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. देशात एकप्रकारची भयंकर अशी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. त्यापासून आपणाला सगळ्यांनाच सावध व्हावं लागणार आहे.

'जेएनयू'तून जो आवाज उठला त्याचा विरोध कसा करायचा, याची संपूर्ण योजना नागपुरातून आखण्यात आली. या सगळ्यामागे आरएसएस आहे.

'जेएनयू' विरोधातील हा हल्ला पुर्वनियोजित होता. अशा हल्ल्यांनी आम्ही दबणार नाही. तुम्ही जेवढं आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न कराल तेवढेच भक्कमपणे आम्ही उभे राहू. अत्याचाराविरोधात 'जेएनयू'ने नेहमीच आवाज उठवला आहे आणि यापुढे हा आवाज असाच बुलंद राहणार आहे.

अयोध्येचा मुद्दा पुन्हा रेटला जात आहे पण यावेळी 'मुंह मे राम और बगल मे छुरी' खपवून घेतली जाणार नाही.

पंतप्रधान 'मन की बात' करतात पण 'मन की बात' ऐकत मात्र नाहीत. पंतप्रधानांनी लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, एका माऊलीच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणारा पंतप्रधान हवा आहे.

मी माझी कहाणी स्वत:च लिहिणार आहे. त्याची सुरुवात मी जेलमधून केली आहे. मी कधीही भारताविरोधात बोललेलो नाही. सत्य हे शेवटपर्यंत सत्यच राहतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हळहळू सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. मी दीर्घ लढाईसाठी सज्ज आहे.

'अभाविप'बाबत आमच्या मनात कोणताही द्वेष नाही. आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो.

तिरंगा फडकला, 'जय हिंद'च्या घोषणा घुमल्या

देश विरोधी घोषणांमुळे कन्हैयावर कारवाई झाली असताना आज मात्र कन्हैयाचं भाषण सुरू असताना तिरंगा डौलाने फडकताना दिसत होता. यावेळी 'जय हिंद', 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी 'आझादी'च्या घोषणांनी सारा परिसर दणादणून गेला होता. 'हम चाहते है आझादी', 'भुखमरी से आझादी', 'संघवाद से आझादी', 'मनुवाद से आझादी', 'दंगाइयों से आझादी', 'सामंतवाद से आझादी, 'जातिवाद से आझादी', 'हम लेकर रहेंगे आज़ादी' अशा घोषणा कन्हैयासोबत विद्यार्थ्यांनी दिल्या.

पुरावा नसल्याचा दावा

येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांनी देशाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा पुरावा नसल्याचे दिल्ली सरकारच्या चौकशीत उघड झाले आहे. दोघांवरही देशद्रोहाचा आरोप आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ९ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात दोघांनीही देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे. मात्र, या संदर्भात कोणीही साक्षीदार उपलब्ध नसल्याचे दिल्ली सरकारच्या अहवालात म्हटले आहे. 'काश्मिरीज कीप फायटिंग, वी आर विथ यू' असे खालिद म्हणत असल्याचे व्हिडिओत ऐकू येते, असे अहवालात म्हटले आहे.

#कन्हैय्या कुमारचे भाषण