Saturday 13 February 2016

शोध लाल महालाचा...शनिवार वाडाच आहे लालमहाल...?

लाल महाल गेला कुठे?

एम. डी. रामटेके.

शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट इतिहासाच्या पानांतुन गहाळ झाल्याचं जाणवतं. शहाजीराजे यांनी जिजाऊसाहेबांसाठी पुण्यात लाल महाल नावाची वास्तु बांधुन देतात. महाराजांची जडणघडण याच वास्तुमधे होते. पुढे स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा जिंकेस्तोवर ईथुनच सगळे सुत्र हलविले जातात. हा असा ऐतिहासिक वारसा असलेला महाराजांच्या बालपणीच्या इतिहासाचा साक्ष असलेला लाल महाल अचानक इतिहासतुन अशा प्रकारे गहाळ होतो की तो शोधुन सापडत नाही. लाल महाल बांधण्यासाठी शहाजी राजानी श्री. झांब्रे पाटलाकडुन जागा विकत घेतली होती अन या जागेवर लाल महाल उभारण्यात आला.

हा लाल महाल केवढा मोठा होता? त्याची लांबी किती? रुंदी किती? त्याची नेमकी जागा आज कुठे आहे? याचे काहीच पुरावे कसे काय सापडत नाही याचं नवलच वाटतं. लाल महालापेक्षा जुन्या वास्तु आजही उभ्या आहेत पण लाल महाल उभा तर जाऊद्या त्याची जागा सुध्दा हरवली आहे. हे असलं हरवणं, मनात ब-याच शंका आणुन जाते. त्यापेक्षा जुना दादोजी कोंडदेवाचा शिरूर तालुक्यातील मलठन गावचा वाडा आजही सापडतो. पण याच दादोजीच्या हाताने बांधुन घेण्यात आलेला १६३७ मधला लाल महाल मात्र नष्ट होतो. हे खरच पटण्यासारखं आहे का? बरं तो महाल होता! असलं हलक पुलकं बांधकाम नक्कीच नसेल. वरुन ती शहाजी राजे यांच्या आदेशाने बांधण्यात आलेली राजकिय वास्तु होती म्हणुन बांधकामही चांगल्या प्रतिच होतं यात दुमत नसावं. याही पलिकडे जाऊन मी असं म्हणेन हे सगळे तर्क गेले चुलीत किमान जुन्या लाल महलाची जागा तरी सापडावी ना! पण ती निशानी सुद्धा सापडत नाही. अरे अहि-या जागेचा निट शोध घेतला तर सगळे जुने रेकॉर्डस सापडतात पण लाल महाला सारख्या अतिमहत्वाच्या ऐतिहासिक वास्तुची जागा सापडु नये म्हणजे दाल मे काला है.

मग सहाजीकच शेजारी उभा असलेल्या शनिवार वाड्यावर शंका येते. अन मला तर खात्रीच आहे आज आपण ज्याला शनिवार वाडा म्हणुन ओळखतो तोच आहे लाल महाल. तुम्ही शनिवार वाड्याचा इतिहास बघा ना. बाजीरावानी शनिवार वाडा बांधण्यासाठी जमिन कुणाकडुन घेतली याचा पुरावाच नाही. बरं त्या वाडयाचं बांधकाम बघा किती जलद गतीने झालं. १ वर्षात शनिवारवाडा बांधुन झाल्याचा इतिहासात उल्लेख आहे. बाजीरावाकडे काय राक्षसलोकं होती की काय, एवढ्या फास्ट बांधकाम करायला. हा शनिवार वाडा आधिपासुनच लाल महालाच्या रुपात उभा असावा. बाजीरावानी त्याला हवे तसे बदल करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी घेतला असावा. अन त्याला शनिवारवाडा असे नाव देऊन पुढे या पवित्र वास्तुत पेशव्यानी नंगा नाच केला.

पेशव्यानी लाल महाल बळकावताना त्याची ओळख मुळातुन उपटुन फेकली. कसलेच पुरावे मागे राहणार नाही याची खबरदारी घेतली गेली. लाल महालाचं नाव इतिहासातुन मिटविण्याचे सगळे उपाय इतक्या पद्धतशीरपणे योजले गेले की आज त्याची जागाही सापडत नाही. पण शनिवारवाडा या वास्तुकडे चिकित्सकपणे बघितल्यास कळेल की हाच वाडा आहे लाल महाल. हे ब्राह्मणी कारस्तानाचं आजुन एक जितं जागतं उदाहरण होय. पेशव्यानी हेतुपुरस्सर ही वास्तु बळकावली व त्यात त्याना हवे तसे बदल करुन मनुवादी नाव दिलं. त्या नंतर येणा-या सगळ्य़ा भटा बामणानी या वास्तुचा पेशव्यांचा शनिवारवाडा म्हणुन उदो उदो केला. बहुजन नायकांना डावलुन समकालीन ब्राह्मणी कर्तुत्वाचं उदात्तीकरण करण्याचा सेम पॅटर्न ईथेही लावण्यात आला. मराठ्यांची वास्तु बळकावुन त्याला शनिवारवाडा हे नाव देण्यात आलं.

लाल महालाचा इतिहास बघा. शहिस्तेखान १ लाखाची फौज घेऊन येतो व ज्या लाल महालात राहतो तो लाल महाल काय एवढुसा असेल का? तसही आज आपण ज्याला लाल महाल म्हणतो तो पुणे महानगरपालीकेनी १९८८ मधे बांधलेला लाल महाल आहे. खरा लाल महाल जिथुन सगळा राजकिय कारभार चालविल्या जात असे तो ईथे हरवुन गेला. त्याचे धागे दोरे सापडत नाही. अन मला हे सापडत नाही म्हणने मान्यच नाही. आजचा शनिवारवाडाच कालचा  लाल महाल होता. बाजीरावाने बांधलेला सागवानी वाडा खरच अय्याशीचा अड्डा बनला होता म्हणुन तो विस्तवात मिसळला. अन तसं होणे म्हणजे या पवित्र वास्तुचे शुद्धिकरण होय. शनिवार वाडा म्हणजेच लाल महाल होय. पेशव्यांनी नुसत अतिक्रमण व नामांतर केल नाही तर या पवित्र वास्तुमधे अनेक पापं केलीत. पेशवे कालात हा लाल महाल शनिवार वाडा म्हणुन ओळखल्या जाऊ लागला. या वाड्यात अय्याशीचे सगळे कळस गाठण्यात आले. बायकांचा नंगानाच याच वाड्यात पेशव्याच्या अदेशाने होऊ लागला. ईथेच बाजीरावानी कित्येक बायकांची अब्रु लुटली होती. याच वाडयातुन दलितांच्या विरुद्ध निर्णय देण्यात आले. याच वाड्यातिल पेशव्यांमुळे जातिभेदाने कळस गाठला होता. अशा प्रकारे पेशव्यांच्या काळात लाल महालावर नुसतं अतिक्रमण करण्यात आल नसुन ईथलं पवित्र्य पाय़ी तुडविल्या गेलं. हे सगळे पाप धुवुन निघणे गरजेचे होते. पेशव्यानी बांधलेले सागवानी वास्तु जळून खाक झाली. अन लाल महालनी कित्येक वर्षा नंतर मोकळेपणाने श्वास घेतला खरा पण पेशव्यानी दिलेलं नाव मात्र आजुन तसच आहे. आता गरज आहे ते नाव बदलण्याची. मुळात ही वास्तु पेशव्यांनी बांधले नाहीच. ही वास्तु आहे मराठा राजा शिवरायांची. ईथल्या भुमिपुत्राची. आता वेळ आली आहे त्या वास्तुला तीची जुनी ओळख बहाल करण्याचे.

वरील लेख संकलित असून लेखातील मुद्दे बरोबर वाटले म्हणून माझ्या ब्लॉगवर शेअर करीत आहे..यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे...

शिवराम ठवरे 13-02-2016

No comments:

Post a Comment