Wednesday 3 February 2016

सरसंघचालक मोहन भागवत यांची समरसता वर्षाच्या नियोजनाबाबत मी घेतलेली मुलाखत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे "सरसंघचालक मोहन भाागवत" यांची मी घेतलेली एक अविस्मरणीय मुलाखत...!

जागतिक विचारवंत,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आपल्यासोबत 13 कोटी लोकांचे सामुदायिक धर्मांतर करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भाजपाप्रणीत NDA सरकारने "सामाजिक समता आणि न्याय वर्ष" म्हणून घोषित केले आहे...!

भाजपचा मार्गदर्शक असणाऱ्या आणि संपूर्ण भारतात मनूस्मृतीवर आधारित धार्मिक राष्ट्र स्थापन करण्याचा अंतिम उद्देश असणाऱ्या "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने" देखील याचा आधार घेत "समरसता वर्ष" म्हणून साजरे करण्याचे घोषीत केले आहे...!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना "पूजनीय स्वरूप" देण्याचा प्रयत्न चालवलेमुळे सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विचारवंत,नेते आणि डॉ.आंबेडकर यांना आदर्श मानून काम करणारे कार्यकर्ते या साऱ्यांना आश्चर्य वाटत आहे...!

अशा वातावरणात माझ्या मनातही चाललेला वैचारिक गोंधळ कमी करणेसाठी थेट "सरसंघचालक मोहन भागवत" यांचेशी संपर्क साधला आणी माझ्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत असलेल्या काही शंकांची उकल करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला...!

जागतिक पातळीवर अतीमहत्वाची व्यक्ती असल्यामुळे "झेड प्लस सुरक्षा व्यवस्था" असतानाही डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत ही काल्पनिक मुलाखत घेताना एक वेगळाच अनुभव मिळाला....!

तुम्हालादेखील तुमच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबत असणाऱ्या शंका दूर करायला या मुलाखतीचा खूप आधार होईल असे मला वाटते म्हणून हि मुलाखत सार्वजनिक करीत आहे....!

शिवराम ठवरे(मुलाखतकार)-नमस्कार आपल्यासारख्या व्यक्तीने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद....मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीं आणि संघाच्या इतिहासाबाबतही काही विचारणार नाही...केवळ "समरसता आणी बाबासाहेब आंबेडकर" यांचे विषयीचे निवडक प्रश्न आपणास विचारेन.

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-समाजासाठी शकय तितका वेळ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे...त्यामुळे आपल्यासोबत होणाऱ्या संवादाबाबत धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही... तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाला मी सरसंघचालक म्हणून निश्चित समाधानकारक उत्तरे देईन.

शिवराम ठवरे-बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती वर्षात अचानक त्यांची संघाला आठवण यायला काय कारण आहे...यामागे काही रणनीती ठरवली आहे काय..?
उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-बाबासाहेब संघाला स्थापनेपासूनच वंदनीय आहेत...त्यांची आणि त्यांच्या विचारांची मी स्वतःदेखील नियमित पूजा करतो...परंतु 125 वर्षे हा एक महत्वाचा टप्पा वाटतो म्हणून आमच्या संघस्वयंसेवकांमध्ये समरसता यावी याकरिता यावर्षीपासून विशेष लक्ष देण्याचे निश्चित केलेले आहे.

शिवराम ठवरे-बाबासाहेब आंबेडकर "हिंदू धर्माचे शत्रू" होते असा प्रचार काही संघप्रणीत हिंदू संघटनाकडून केला जातो त्यांच्या धर्मांतरालादेखील हिणवले जाते हे माहित असूनही तुम्ही बाबासाहेब संघाला पूजनीय आहेत असे कशाच्या आधारावर बोलता...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-संघाने अधिकृतपणे कधीही "बाबासाहेब हिंदूद्वेषी" होते असे जाहीर केलेले नाही.... आमच्या "उपसंघटना" स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यामुळे त्यांचे मत व्यक्त करण्याचे त्यांना स्वातंत्र आहे..सध्या केवळ मुस्लिम आणी ख्रिश्चन धर्माचे आव्हान माघारी लावणे असे संघाचे धोरण आहे...बौद्ध लिंगायत शिख जैन आणि इतर धर्मांचे अस्तित्व संपवणे हे दीर्घकालीन धोरण आहे...तोपर्यंत मी देखील नसेन आणि तुम्हीदेखील असाल असे मला वाटत नाही... सामाजिक बदल ही काही एका वर्षात होणारी प्रक्रिया नाही ते दीर्घकालीन धोरण आहे.

शिवराम ठवरे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "सामजिक समरसता" याचा नक्की अर्थ काय अपेक्षित आहे..?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-संघाची संरसतेची संकल्पना खूप सोपी आहे...इथल्या मूळच्या "सिंधुजन अनार्य संस्कृतीचा" नाश करून परकीय ब्रह्माणी पुरुषसत्ताक पद्धती निर्माण करणे या एकमेव उद्देशाने आमचे बाहेरून आलेले आर्य पूर्वज वेगवेगळ्या मार्गाने हजारो वर्षे झाली प्रयत्न करीत आहेत...पण "सिंधूजन अनार्य संस्कृती" नाश होणार नाही हे लक्षात आल्यामुळे आम्ही तीच आमची संस्कृती म्हणवून घ्यायला सुरुवात केली याचप्रमाणे इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांना संघाने प्रमोट केलेला विचारच स्वीकारावा लागेल म्हणजे यात मिसळून समरस व्हावे असा सोपा अर्थ आहे....वर्णव्यवस्थेनुसार जन्माने मिळणाऱ्या प्रत्येक जातीला नेमून दिलेले काम करायला कमीपणा न वाटता ते काम सामाजिक हित म्हणून करावे म्हणजे समरसता...आजची पिढी शिक्षित झाली आहे त्यामुळे पाप-पुण्याची भीती त्यांना वाटत नाही आणि "दशावतार" सारख्या "काल्पनिक कथा" आता कोणी स्वीकारत नाही त्यामुळे अशी गोंडस नावे ठेऊन समाजात जावे लागते.

शिवराम ठवरे-बाबासाहेब हयात असताना "अस्पृश्यता निर्मूलन,जातप्रथा निर्मूलन" याकरिता संघाने कधीच मदत केली नाही उलट त्यांच्या प्रत्येक सामाजिक बदलाचे कामास हिंदूंच्या संघटना विरोधच करत होत्या आणि आता तुम्ही त्यांच्या विचरांवर चालायचे ठरवले आहे हे कसे शक्य झाले...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-मला मान्य आहे हिंदुत्ववादी लोकांनी भूतकाळात बाबासाहेब आंबेडकर याना खूप त्रास दिला आहे...अगदी राज्यघटना समितीवर बाबासाहेब नकोत अशीच संघाची भूमिका होती...घटना संमत होताना झालेली चर्चा आजही लोकसभा ग्रंथालयात उपलब्ध आहे त्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते विरोध करताना दिसतील अगदी हिंदू कोड बिलास देखील त्यांचा विरोधच होता..पण आता त्याचा सर्वच लोकांना विसर पडला असून तितका खोलवर अभ्यास करणारी पिढी आताची नाही. बाबासाहेबांच्या नावाखाली जागृत असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे निर्दालन करणे हा एकमेव उद्देश आहे...चवदार तळ्यावर बाबासाहेबाना मारणारी वृत्ती मनुवादीच होती पण आता "गोड बोलून फसवणे" हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे आम्ही बाबसाहेब जवळ केले आहेत.

प्रश्न क्रमांक सहा :- शिवराम ठवरे-शेवटचा प्रश्न समरसता वर्ष साजरे करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आगामी "कृतीकार्यक्रम" काय असेल...?

उत्तर :- सरसंघचालक मोहन भागवत-अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात त्याबाबद्दल तुमचे अभिनंदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अंतर्गत असलेला विरोध झुगारत "पंचशील" हे सूत्र लक्षात ठेवत खालील प्रमाणे "पाचकलमी कार्यक्रम" तयार केला आहे.

1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व शाखा कार्यालयावर "राष्ट्रध्वज तिरंगा आणि पंचशील ध्वज" फडकावणे.

2. संघाचे शाखेत "बाबासाहेब आंबेडकर याची प्रतिमा" लावणे व त्यास दररोज "त्रिसरण आणि पंचशील" म्हणत अभिवादन करणे...याचा अधिक प्रचार व्हावा म्हणून सर्व संघ स्वयंसेवक आणि संघाच्या कोणत्याही शाखेत भेट देणाऱ्या व्यक्तीस बाबासाहेबांची प्रतिमा आणि त्रिसरण पंचशील असलेली हँडवेल भेट देण्यात येईल.

3.संघाचे शाखेत येणाऱ्या सर्वांना जातव्यवस्था निर्दालन व्हावी याकरिता "आंतरजातीय विवाह" करावेत म्हणून प्रोत्साहित किले जाईल त्याचाच एक भाग म्हणून "आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तीचीच पदाधिकारी" म्हणून निवड केली जाईल.

4.बाबासाहेबानी धर्मांतर करताना दिलेल्या "22 प्रतिज्ञा" दररोज म्हणून त्याचे अनुकरण करावे असा दंडक केला जाईल.

5.भारतीय "संविधानाचे पारायण" सुरु केली जाईल आणि त्याचा अर्थ उलगडून सांगणेकरीता अभ्यासू लोकांची नियुक्ती करण्यात येईल.

वरील "पंचसूत्रीचा" किमान पुढील 10 वर्षेतरी अंमल व्हावा हे आमचे धोरण आहे माझी या खूप महत्वाच्या मुद्यासाठी मुलाखत घेतलीत त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे.

शिवराम ठवरे- 03-02-2015
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

टिप- वरील संपूर्ण काल्पनिक मांडणी तयार करण्यात आमचे विद्रोही मित्र डॉ. जालिंदर घिगे,दिग्विजय पाटील,मयुर खराडे,युवराज जाधव,गौतम कांबळे,राहुल गंगावणे,रोहित क्षीरसागर आणी निलेश पाटील यांच्यासोबत रविवार दिनांक 31 जानेवारी 2016 रोजी सातारा येथे केलेली चर्चा खूप उपयोगी पडली असून "मोहन भागवत" यांनी वेळ दिल्यास प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला आनंद वाटेल.

No comments:

Post a Comment