Monday 15 February 2016

"देशद्रोही आणि लाल सलाम"--शिवराम ठवरे

"देशद्रोही आणि लाल सलाम"

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बीजेपी जाणून बुजून देशद्रोही राजकारण करीत आहे. रोहित वेमुला प्रकरणात "भीम प्रेमी" दुखावले आहेत. "आता अच्छे दिन येतील" आणि हाताला काम मिळेल असा प्रामाणिक विचार केलेला तरुण" कंत्राटी नोकरी" करत शिव्या घालत बसला आहे.शेतकरी, कष्टकरी अगोदरच त्यांच्यापासून दुरावला आहे...!

महिलांना तर मनुवादी विचार जवळही करत नाहीत...प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या बायकोची "माहिती अधिकार याचना" देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे याचबरोबर "घरवापसी लव्ह जिहाद" सारखे मेलेले मुडदे जागे होत नाहीत...!
लोकसभेत बहुमत असूनदेखील सत्तेत आल्यापासून देशात काहीच "सकारात्मक बदल" झालेला नाही..सर्वच जनतेतून नकारचा पाढा सुरु असल्यामुळे आता "मोदी-शहा भयभीत" झाले आहेत आणि आता राममंदिर मुद्दा पहिल्यासारखा "परिणामकारक" राहिला नाही...!

24×7 तरुण जागे असलेल्या जमान्यात आता कोणताच खोटेपणा काही चालत नाही..गुजरातचा "विकासाचा फुगा" दूर कुठेतरी निघून गेला आहे...!

देशातील सारे "विरोधक संपवले" अश्या वल्गना करणाऱ्या भाजपाला प्रत्येक निवडणुकीत नामुष्की सहन करावी लागत आहे."जागतिक पातळीवर डावे संपले आहेत" अशा टिपिकल घोषणा देणारे  "लाल सलाम" घोषणेला मात्र घाबरले आहेत...!
भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही विरोधात सातत्यपूर्ण संघर्ष करणारे डावे कार्यकर्ते...."अभ्यास-संघर्ष-संघटन  - प्रामाणिकता आणि आपणच जिंकणार" अशी उच्चकोटीची इच्छाशक्ती घेऊन "ऐतिहासिक लढाई" देत होते...!

डावे कार्यकर्ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिचलेल्या वर्गाचे अखंड नेतृत्व करीत आहेत...निस्वार्थीपणे काम करत मरेपर्यंत जिंकण्याची आशा न सोडता जगणारे "कॉम्रेड" सर्वसामान्य जनता आजपर्यंत पाहत आली आहे...!

"भांडवली शक्ती" आपल्या सर्व साधनांचा वापर करीत आजवर डावे विचार दडपत होती..आजच्या तंत्राच्या युगात मात्र "लाल सलाम" जोरात घुमू लागला आहे त्यामुळे सर्वच जाती धर्मातील काहीच जवळ नसलेला वंचित आवाज आता "मार्क्सच्या अवघड भाषेतील जगण्याच्या सोप्या मांडणीला" जवळ करू लागला आहे...!

अशातच दिल्ली,बिहार आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पराभव झालेमुळे त्यांनी आता अंतिम "धार्मिक अस्त्र" बाहेर काढले आहे.....!

निस्वार्थीपणे काम करणारे अभ्यासपूर्ण संघर्षशील आणि संघटित कार्यकर्ते यांचे बळावर निवडणुकीचे सांखिय बल जवळ नसतानाही देशपातळीवर "दहशतवादी मनुवादाला" मूळातून डावेच पराभूत करू शकतात हे माहित असल्यामुळे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे" आदेशाने देशद्रोही मोहीम चालवली आहे...!

यातून त्यांना कदाचित तत्कालीन राजकीय फायदा फायदा बिजेपीला  मिळेलही पण न्यायालयत डाव्या कार्यकर्त्यावरील आरोप टिकणार नाहीत ते निर्दोष मुक्त होतील...!

पण देशातील श्रमिक कष्टकरी वर्गाचे "मनुवादी भांडवली शोषण" संपणार नाही त्यामुळे निवडणुकीतील हरण्याची कधीच तमा न बाळगणारे डावे कार्यकर्ते कधीच जिद्द सोडणार नाहीत. "लढेंगे जितेंगे" असे म्हणत अविरतपणे त्यांची "भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही" विरोधी लढाई जिंकण्याकडे वाटचाल करेल यात शंकाच नाही...!

शिवराम ठवरे 16-02-2016
मुक्त पत्रकार-9175273528
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment