Monday 10 January 2022

किन्हईच्या शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

किन्हईच्या शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिवशीच कोरोना संकटानंतर दीड वर्षांनंतर शाळा सुरु होतं आहेत त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..!

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेऊन आणि सरकारी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आज शाळेची पहिली घंटा वाजली. कोरोनानंतर मुलांचा पहिला दिवस तसेच पाचवीच्या वर्गातील मुलांचा हायस्कूल शाळेतील पहिला दिवस आनंदात सुरू  झाला..!

शाळा प्रशासन, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी गावातील ग्रामस्थ, पालक आणि जनमित्र सामजिक विकास संस्थेच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले..!

नव्याने हायस्कूलमध्ये आलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुले आणि खाऊ देऊन स्वागत केले यावेळी सामजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..!

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भोकरे सर, दिघे सर, पंचायत समिती सदस्य निवृत्ती होळ तसेच जनमित्र सामाजिक विकास संस्थचे राजेश पवार (गुरव), शिवराम ठवरे आणि शाळेचे माजी विद्यार्थी ॲड.मंदार प्रकाश ढवळे आणि अजय भोसले यांचे सहकार्य लाभले..!

*शिवराम ठवरे-9175273528*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3050879358489809&id=1469089860002108

No comments:

Post a Comment