Friday 8 July 2016

शेतकरी ते ग्राहक भाजीपाला

कृषीमाल नाशवंत आहे शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना कितीही छान वाटत असली तरी वास्तवात 10 ला पावशेर असे सांगितले तर 15 चं अर्धाकिलो देणार का...जरा शिळीच दिसतेय... असे काही बाही म्हणत चिवडून मला घेणारी मानसिकता कोण बदलणार...?
बरं शेतकरी काय एक आन अर्धा गुंठा भाजीपाला लावत नसतो...एखादी पाटी काढली कि फिरून यावा.... विक्रीतच दिवस गेला तर रोजचं काम कोण करणार...?
अच्छे दिनाचे हेदेखील स्वप्न भ्रामक असून सहकार क्षेत्र मोडीत काढून...सामान्य व्यापारी वर्गालादेखील झोपवून शेतीमध्ये भांडवलशाही तयार करण्याचं हे मोठं कारस्थान आहे...!
भाजीपाला पिकवयला कधीच रानात न जाणारा... आणि भाजीपाला आणायला कधीच मंडईत न गेलेला आजचा सोशल मीडियावर जागृत असणारा समाज यातील वास्तव न समजून घेता या सरकारी दाव्याचे पोकळ समर्थन करीत आहे हि त्यापेक्षा जास्त खेदाची बाब आहे...!
शिवराम ठवरे 01-07-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment