पुण्याचा "शिवसंगम मेळावा" म्हणजे शिवसेनेचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा "नागपुरातील अर्ध्याचड्डी वाल्यांचा पूर्ण डाव.....?
मागील काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात "शिवसेना आणि भाजपा" यांची युतीच्या माध्यमातून असलेल्या मैत्रीमुळे दोघांचाही काय फायदा तोटा झाला तो ज्याचा त्याला माहीत आहे....!
हिंदूत्वाच्या समान पायावर उभी असलेली युती RSS च्या "नागपुरी" सुरीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आधार घेत तोडून टाकली....!
संपूर्ण देशात मोदींच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण करता येते याचा भ्रम तयार झाल्यामुळे "हाफचड्डीच्या" मार्गदर्शनामुळे भाजपा स्वतंत्र लढला.....!
ढ़िगभर, आश्वासने, जाहिरातबाजी, जातीय सामिकरणे आणि धार्मीक राजकारण करुनदेखील सत्ता मिळावी इतके "बहुमत" न मिळाल्यामुळे नाइलाजाने शिवसेनेला सोबत घेतले...!
सत्तेत सहभागी करुन देखील "दुय्यम वागणूक" सहन करत शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांची हेटाळणी सुरु आहे...यामूळेच शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेत रस्त्यावर संघर्ष करत जनाधार मिळवणेसाठी प्रयत्न करीत आहे....!
मागील वर्षभरात झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील "हाफचड्डीच्या आडमुठया" मार्गदर्शनामुळे भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढ़वली...पण दोघानाही ते परवडले नाही...!
मुळात महाराष्ट्रात जातीय समीकरणे पाहता बहुसंख्य "ब्राह्मणेतर समाज" शिवसेनेचा जनाधार आहे...आणि हा जनाधार संपवले शिवाय "शिवसेना संपवता येणार नाही" याची भाजपाला जाणीव आहे...!
भाजपामधे गोपीनाथ मुंडे यांचेनंतर "एक दानवे बाक़ी जानवे" अशी परिस्थिती असली तरी "संघाचे हिंदुत्व न समजलेला हिंदू समाज" भाजपाला जवळ करु लागला आहे त्यामुळे याचा लाभ् घेत महादेव जानकर यांचे राष्ट्रीय समाज पक्ष , राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचे राजकीय महत्व जसे कमी केले तसे शिवसेनेला सोबत घेऊन संपवणे हे त्यानी धोरण समोर ठेवले आहे...!
आगामी "मुंबई आणि पूणे महापालिका" देखील स्वतंत्र लढून ताब्यात घेणेकरीता 3 जानेवारी रोजी संघाच्या माध्यमातून रणनिती ठरवली आहे हे कोणाही राजकीय विश्लेषकास सहज समजेल...!
मुंबईत बहुसंख्य कोकणी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जातीय समाज आहे....पुण्याच्या या "शिवसंगम" नावाच्या संघीय मेळाव्यात नियोजन करणे पासून भाषणबाजी करीता सर्वच भाजपा नेते पुढाकार घेत आहेत...!
"शिवाजी महाराज" या शब्दाचे महत्व हाफचड्डीने जाणले आहे त्यामुळे शिवसेनेतील "शिव" शिवसंगमच्या माध्यमातून नियोजनपूर्वक संपवणे सुरु आहे...!
त्यामुळे हा "शिवसंगम मेळावा" यशस्वी झाला तर "कोंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा" शिवसेनेचीच गोची होणार आहे...!
मेळाव्यात सहभागी होनणेकरीता पूणे आणि परिसरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीच "हाफचड्डी" घालून येणार आहेत यामागे मागील 6 महीने चालू असलेल्या "संघीय शाळाभेटी" आणि "मिसकॉल करा आणि हाफ चड्डी मिळवा" हि मोहीम कारण असेल....!
केवळ हाफचड्डी घातली म्हणजे तो संघाचा स्वंयसेवक झाला असे होत नाही पण केवळ "सेल्फ़ीच्या फोटोकरीता" तरुण नोंदणी करीत आहेत...त्या पैकी कुणालाही "संघाचे खायचे दात" माहित नाही आहेत...!
तर भाजपा आणि संघाला केवळ शक्तिप्रदर्शन करुन शिवसेनेला संपवून आपले राजकीय सामर्थ्य वाढ़वायचे आहे असे मला वाटते...!
त्यामुळे संघाचे शिवाजी महाराजांचे नाव घेत पुण्यात होत असलेले हे "चड्डी प्रदर्शन" शिवसेनेचा कसा घात करेल हे पाहणे आगामी काळात खुप मजेशीर असेल....!
शिवराम ठवरे-01-01-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com
No comments:
Post a Comment