Thursday 7 April 2016

आपले पूर्वज कोण होते...?

आज प्रत्येक समाजातील तरुण आमचे पूर्वज कसे शूरवीर होते....लढाई करत होते....शत्रूला कापून काढत होते....याचा इतिहास शोधून स्वतःला महान ठरवत आहे....!

पण वास्तवात आता पूर्वीसारख्या टोळीच्या लढाया आता कुणाला करायची वेळ येणार नाही आणि कुणी स्वतःचे समाजासाठी "स्वराज्य निर्मिती" करायचा प्रयत्न करू लागला तर ते "देशविरोधी कृत्य" होईल आणि भारतीय संरक्षण व्यवस्था त्यांचा बंदोबस्त करेल....!

आता लोकांनी आपण लोकशाहीत राहतो हे वास्तव लक्षात घेऊन....आपले पूर्वज केवळ लढाईच करत होते अशा भ्रमात न राहता त्यांचा "अभ्यास संशोधन आणि सर्जनशीलतेचा" वारसा पुढे आणावा लागेल तरच आपला आणि समाजाचा विकास होईल...!

आपले कायदेशीर हक्क आणि अधिकार जाणून घ्यावेत आणि "तलवारी" नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा "लेखणी" हातात घेऊन जगावर राज्य करावे....!

24-02-2016

No comments:

Post a Comment