Thursday 7 April 2016

शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी...?

शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!

1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका

पण मला भावलेले शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!

1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे" शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!

3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!

5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक"होते ...!

खर्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते सर्व धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

दीपक कोठावळे Deepak Kothawale
संघटक-विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment